दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।। 


                                  आषाढ अमावस्या - दीप अमावस्या 

                                     सोमवार १७ जुलै २०२३ रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच  दीप अमावस्या आहे. आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या पूजांच्या तयारीसाठी घरातील सर्व दीप स्वच्छ करून भक्तिभावाने पुजले जातात . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप मांगल्याचे प्रतीक आहे .दीपपूजन करून गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतात , दीप आरती म्हणतात .सर्वदिप प्रज्वलित करून पूजा करतांना इतकं प्रसन्न आणि आनंदमय वातावरण होत.आणि एक उत्साहाची लहर शरीरात उत्पन्न होते .

या दिवशी मांसाहार करून पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत मांसाहार करीत नाहीत .पण सध्या या बेधुंद आणि बेबंध राहणाऱ्या काही समाज कंटकांनी गटारात लोळण्याची वेळ येईपर्यन्त दारूच्या बाटल्या ढोसून so called " गटारी अमावस्या " म्हणून या दिवसाची निर्बत्सना केली . आणि दुर्दैव असे कि सोसिअल मीडियावर मुद्दाम मुद्दाम गटारी अमावस्या म्हणून उल्लेख केला जातो काही वाहिन्यांनी तर कहरच केला - चित्रपटाची जाहिरात करतांना " गटारी स्पेशल " म्हणून उल्लेख करतात . खरंतर दारू ढोसणाऱ्याला दिवस आणि मुहूर्ताची काही गरज नसते - आली लहर केला कहर अशी त्यांची अवस्था असते . पण जाणूनबुजून संस्कृती बद्दल गैरसमज वाढवणाऱ्या या वळवळत्या किड्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ज्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते अबाधित राहत हे पक्के ध्यानात ठेवाव

अनेक साईटवर दीप अमावास्येची माहिती दिलेली असते , आणि काही साईटवर शेवट अशी टीप लिहिलेली असते कि " येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. " बरोबरच आहे कारण शास्त्राला " अनुभूती " म्हणजे काय हे कळतच  नाही , शास्त्र तिथपर्यंत पोचूच शकत नाही मग  शास्त्र कसले पुरावे देणार !

                                                                                                                      ...... मालकंस 

  अधिक मास 

                                                                   पुरुषोत्तम मास 


                                             आपली हिंदू कालगणना , पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती , पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती या तीन  परिमाणांवर केली जाते म्हणजेच सौरवर्ष आणि चांद्र वर्ष . या तीन  गतींमध्ये दरवर्षी अकरा दिवसांचा फरक पडतो .आणि हा फरक भरून काढण्यासाठी बत्तीस  महिन्यांनी  अधिक मास घेतला जातो ज्या महिन्यात रवीची संक्रांत होत नाही .आणि हा काळ आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यांमध्ये असल्यामुळे अधिक श्रावण येतो .

                                       अधिक महिन्यात , मुलगी आईची ओटी भरते तसेच जावयाला , ब्राह्मणाला , गाईला अधिक महिन्यात वाण देतात अधिक मास - या वर्षी - १८ जुलै २०२३ प्रतिपदा  ते १६ ऑगस्ट २०२३ अमावस्या .

                                      बाकी आपण श्रावण सोमवार  , इतर उपवास , व्रत वैकल्य पारायण वाचन हे श्रावण महिन्यातच करावे . श्रावण मास -  या वर्षी - १७ ऑगस्ट २०२३ प्रतिपदा  ते १५ सप्टेंबर २०२३ अमावस्या

         या वर्षी श्रावण सोमवार - २१ ऑगस्ट २०२३ /  २८ ऑगस्ट २०२३ /  ४ सप्टेंबर  २०२३ / ११ सप्टेंबर  २०२३

अधिक महिन्यात दशमी , एकादशी , द्वादशी पौर्णिमा या दिवशी दान देतात .अधिक महिन्यात गंगास्नान हि करावे . अनारसे ,बत्तासे पेढे यांची दान दिली जातात . 

                                अधिक  मासात विष्णू स्वरूप कृष्णाचे महत्व असल्यामुळे कृष्णाला अधिक मासात दररोज तुळशी वाहून लोण्याचा नैवेद्य दाखवतात 

                                                                                                  ..................................मालकंस 

                                                                                                                          विनता उद्योग समूह 

वैवाहिक जीवन - विनता सोसिअल - मराठी - भाग १ - Vaivahik Jivan - Part १

                                        वैवाहिक जीवन 

भाग १
                " आमच्या वेळी असं होत ,,आमच्या वेळी तसं होत ,,  आम्ही खरं आयुष्य जगलो " 
                       छे ,ऐकून ऐकून कंटाळा आला आहे , जुन्या  काळातलं सांगत राहतात 
                 अहो काळ किती बदलला आहे , आता जुन्या गोष्टी काही राहिलेल्या नाहीत .
               खूप बदललेल्या आहेत 
कोण  सांगणार यांना ?
गोष्टी बदलेल्या आहेत ? खरंच असं वाटत ?
साठ सत्तर वर्षांपूर्वी पुरुष जसा होता तसाच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी स्त्री जशी होती तशीच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी दोचांमध्ये ज्या भावना होत्या त्या आजही आहेत 
संतती होण्यासाठी दोघांनी एकत्र येणं हे आजही गरजेचं आहे जे पूर्वीही होत
स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांचा सहवास , हवाहवासा आजही वाटतो .
या सर्व जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत त्या आजही तश्याच आहेत 
मग बदललं काय ?
" विचार "
" तंत्रज्ञान "
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला !
विचार बदलले तसे आचारही बदलले .
विचार बदलले  तश्या अपेक्षा . राहणीमान , भावनांचा अग्रक्रम बदलला 
तंत्रज्ञानाचा पगडा विचारांवर इतका पडला कि 
काय करावं , काय करू नये , याचा सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली 
 प्रेम वात्सल्य ,त्याग ,आदर, विनम्रता , विश्वास  ,संयम आणि स्वार्थ .या भावना आजही मनात आहेत 
पण .......
भ्रामक सुखाच्या अति मागे लागल्यामुळे स्वार्थ या भावनेने बाकी भावनांना बांधून ठेवलं
चार भिंतीत एकत्र राहत असले तरी एकमेकांपासून फार दूर 
मी आणि माझं विश्व् या भोवतीच फिरत राहिलो .
सामाजिक विचारांच्या बदला मुळे
स्त्री घराबाहेर पडली , पूर्वी   कधी जे तिने विश्व् बघितलं नाही त्या विश्वात ती लीलया रमायला लागली.
स्त्रीच्या आचारतेत झालेला हा बदल खरंच व्यक्ती म्हणून निर्विवाद कौतुकास्पद आहे .
पण हे कौतुक काही अंशी पुरुषाला मानवल नाही . 
आणि 
जीवन होडीच्या मध्यावर हातात हात घालून उभी असलेली ती दोघं 
होडीच्या दोन टोकावर जाऊन राहिली .


  

कलेचा बाजार


    ।। श्री ।।


                                                      बाजार 


मला अजूनही आठवतात ते दिवस साधारण सन १९८४ /८५ चा काळ असेल , त्या वेळी मुंबई दूरदर्शन वर “ गजरा “ म्हणून एक कार्यक्रम असे. त्यावेळच्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेले , त्यामध्ये छोटे छोटे प्रवेश असत कि ज्यामधून , विनोदी ,गंभीर ,सामाजिक प्रश्न ,समाजातील अनेक व्यक्तींच्या स्वभावाचे पैलू , अश्या विविध अंगांनी हा कार्यक्रम सादर व्हायचा . विशेष म्हणजे  दूरदर्शन वरचा प्रेक्षक वर्ग आठवड्यातून एकदाच असला तरी वार  लक्षात  ठेऊन आतुरतेने पाहत होता कारण तो अत्यंत जिवंत होता ,उत्कृष्ठ लेखन , दिग्दर्शन कलाकार ,सर्व सर्वच अफाट असायचं कलेतील आविष्कारांचे सुंदर दर्शन घडत असे . महत्वाचे म्हणजे दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाची लोकप्रियता हि कलाकारांवर ठरत असे ! त्यामुळे  प्रमोशन , वारंवार कार्यक्रमाच्या जाहिराती हे करण्याची गरजच नव्हती कारण जे मुळातच उत्कृष्ठ आहे ते सारखे सारखे कधीच सांगावं लागत नाही कि हे उत्कृष्ठ आहे !. फुल खिले हैं गुलशन गुलशन , आपली माती आपली माणसं  , चित्रहार नाटक एकांकिका मुलाखती लहान मुलांसाठी किलबिल 

         त्यावेळी दूरदर्शन वरचे कार्यक्रम मोफत होते पण दर्जेदार होते. 

हे आज प्रकर्षाने आठवलं कारण “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ सीरिअल पाहून...... 

वडिलांचा लाथेने फेटा उडवला जातो इतका त्यांचा अपमान होतो  तसेच हाडाची शिकशीका असतांना तिच्या पावित्रावर  शंका घेणारे खोटारडे आरोप केले जातात . असे असतांना हि ती शिक्षिका मी कशी पवित्र आहे याचे लाजिरवाणी समर्थन देते आहे .  

वास्तविक हे सर्व पाहिल्या आणि ऐकल्यानंतर तिच्या पायाची आग मस्तकात जायला हवी होती .  “ कुणा कुठल्या  गुंडाने सांगितलेलं तुम्हाला खरं  वाटत. आणि माझ्यावर तुमचा विश्वास नाही . आज लग्नाच्या दिवशी इतका अविश्वास मग लग्न झाल्यावर मला “ बाजारी औरत “ म्हणूनच घोषित कराल , मलाच तुमच्या या नंदीबैलाशी लग्न करायचं नाही , ताबडतोब चालते व्हा इथून ”.व्यक्तिरेखा हि त्याच्या स्वभाव आणि विचारांप्रमाणे वागत असते हेच आताच्या लेखकांना समजत नाही . 

         27 जून २०२३ चा भागाचं  लिखाण तर इतकं दयनीय होत कि सीरिअल पाहणेच सोडून दिल .    आजच्या एकूण मराठी दूरदर्शन वरच्या सीरिअल बघून एकूणच निर्मितीची दयनीय अवस्था झाली आहे , 

आज कार्यक्रमाचा दर्जा कलाकार नाही , तर मीडिया म्हणजे पर्यायाने multinational कंपन्या ठरवतात . बाजारात विक्रीला असलेल्या वस्तू प्रमाणे !


                     असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी यावर क्लिक करा 


भ्रष्टाचाराचा रोग


                       असा चालतो राज्यकारभार 

                                                                                       










 ६ एप्रिल २०२३

लाच स्विकारताना वीज वितरणचे वाडा शाखेचे सहाय्यक अभियंता याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले नुसती इतकीच बातमी देऊन प्रतिबंधक पथकाने थांबू नये , त्या अधिकाऱ्याच्या बाबतीत काय निर्णय झाला याचीही बातमी द्यावी नाहीतर बोलाची कढी आणि बोलाचा भात , ह्योही माझोच आणि तोही माझोच
रंगे हात पकडले असे दाखवून लोकांना चुतीया बनवणे ! असे नको नाहीका ?

Ajab Nyay - अजब न्याय सरकारचा


                            सेवा न देताच वसुली 

                               सरकारचा अजब न्याय 

 आता वेगवान निर्णय घ्यायचे म्हणजे हुकूमशाही करावीच लागणार नाही का ?

           लोक अदालतची  हि जनतेला गुगली 


 BSNL ने  landline ग्राहकांकडून सेवा न देता बिल वसुली केली . देवगड मधील BSNL कार्यालय अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्वश्रुत आहेच आणि प्रत्येक ग्राहकास त्याचा अनुभवही आहे .त्याचं  झालं असं मला १८ मार्चला २०२३ लोकअदालतचि नोटीस आली .तशी देवगड तालुक्यातील अनेक ग्राहकांना आली .जुलै ऑगस्ट २०२० चे landline चे बिल भरले नसल्यामुळे तडजोड करण्यासाठी ची ती नोटीस होती .माझा landline ५ मे २०२० पासून बंद होता म्हणून मी लेखी तक्रार केली , मे जून २०२० चे बिल मला आले , ५ मे पासून फोन बंद असल्यामुळे मी बिल काही भरले नाही .पुन्हा लेखी तक्रार केली , मला BSNL च्या अधिकाऱ्याने आश्वासन दिल कि हे मे जून २०२० चे बिल भरा  तुमचा फोन चालू करतो .फोन तर काही चालू झालाच नाही पण जुलै ऑगस्ट २०२० चे हि बिल आलं . मी ते बिल भरलं नाही . माझ्याकडे सर्व तक्रार केलेल्याच्या पोच पावत्या , बिल भरल्याची पावती सर्व काही होत .

लोकअदालतचि नोटीस आली आणि मला थोडं हायस वाटलं ,चला ग्राहकांच्या बाजूने आपली बाजू तरी न्यायालयात मांडता येईल निदान देवगड BSNL कार्यालय किती बेजबाबदार आहे हेतरी सांगता येईल , सेवा न देताच पैसे भरणा करा म्हणून नोटीस आलेले अनेक ग्राहक त्या दिवशी तिथे असणार याची मला खात्री होती , आणि त्यामुळे आपली बाजू मांडायला खूपच सोप्प जाणार होत .

देवगड च्या लोकअदालत  मध्ये वेळेत पोचलो. BSNL ग्राहकांची भेट घेतली आम्ही सर्वजण एकाबाजूला बसलो , बँका आणि कर्जदार यांच्या तडजोडी चालू होत्या , मी पुढेच बसलो होतो , न्यायाधीश साहेब मधेच विचारते झाले - तुमचं काय ? मी म्हटलं BSNL , ते लगेच म्हणाले इथे नाही मागच्या बाजूला , आमच्या सर्व BSNL ग्राहकांची वरात मागच्या बाजूला , चौकशी करता कळलं कि एक टेबल टाकून BSNL चे अधिकारी वसुलीसाठी बसलेले होते .एक देवगडचे आणि एक सावंतवाडीचे ! मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं कि लोक अदालतचि नोटीस आहे ना मग न्यायाधीश साहेब ,  वकील आहेत कुठे , ? इथे ते कुणी नाही आमच्याबरोबरच तडजोड करायची आहे 

आणि मग त्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या सरकारी खाक्यात असं काही ग्राहकांना घेतलं कि अनेक जण अर्ध तर अर्ध बिल भरायला तयार झाले, मी म्हटलं मी नाही बिल भरणार, मग अधिकारी म्हणाले कोर्टाची नोटीस येईल तेव्हा तुम्हाला भारावीच लागेल , मी म्हटलं मग आटा माझ्या हातात नोटीस आहे ती कुणाची ?  नंतर त्याचे एकच  उत्तर तुम्ही  जाऊ शकता घरी .

नोटीस लोक अदालतचि,  पण बाजू ऐकणारे न्यायाधीश साहेब , वकील कुणीच नव्हते  , लोक अदालतचि नोटीस देऊन लोकांना सहज  फसवलं   मूळ मुद्दा - सेवा ना देताच बिल वसुली करत आहेत हि ग्राहकांची बाजू ऐकायला कुणीच नव्हते. मी हि तडजोड करून बिल भरून टाकलं. कारण   

लोक अदालतचि नोटीस देऊन जर लोक अदालत लोकांशी अशी वर्तणूक करणार असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ? 

  त्या नोटीस मध्ये " तरी प्रकरण तडजोडीने निकाली होणे करिता दिनांक 30 एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठेवण्यात येईल " असे स्पष्ट लिहिलेले आहे .आणि प्रत्यक्षात न्यायाधीश साहेब नाहीत वकील नाही आणि अदालत हि नाही सगळाच  बकवास !

-----गणेश वेलणकर , नाडण , देवगड 

जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna । भाग २

  जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna ।

नातं ....

---- नातं म्हटलं कि त्याचा थेट संबंध मानसिकतेशी जातो , आणि मानसिकता म्हणजे भावनांचा खेळ ! भावनांचा खेळ आपल्या नात्याचे भविष्य ठरवत असतो आणि त्या भावना म्हणजे प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम

आजच हे धाकदगदीचे जीवन , बदललेला काळ असे म्हणून आपण जीवनातील या अत्यंत महत्वाच्या मानसिक पैलूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो . हेच पैलू आपले जीवन सुखी करीत असतात..

बदललेले दृष्टिकोन ..... . गृहिणी - कुटुंबाचा आधारस्तंभ , कि जिच्यामुळे कुटुंबव्यवस्था अबाधित होती ,प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम या सर्व भावना तिच्या ठायी असायच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याची शिकवण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला देत असे आणि ती म्हणजे " आई " आता काळ बदलला म्हणजे समाजाने बदलला ,जीवनातील मूल्ये बदलली , जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला , तंत्रज्ञाना मुळे कुटुंबातील भावनांचा एक घट्ट बंध होता तो सैल झाला एकमेकांपासून दुरावले , एकाच छताखाली राहत असले तरी काहीसे एकमेकांना अनोळखी , मूल्य - उत्कृष्ठ भावी पिढी घडवणाऱ्या या आईचे मूल्य हा समाज म्हणजे पर्यायाने पुरुष समजू शकले नाहीत .प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम ह्या गोष्टी जिच्याठायी होत्या तिला प्रत्येक बाबतीत गृहीतच धरलं गेलं तिच्यावर वर्चस्व गाजवलं गेलं .कालांतराने ती करिअर साठी घराबाहेर पडली . आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली . आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याच्या मार्गावर राहिली . गरज कशाची - प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम .ह्या सातही हि गोष्टी ज्या दोघां जोडादारांमध्ये आहेत त्यांचे नाते कधीही तुटू शकत नाही , कितीही संकटं आली तरी या सात गोष्टी संकटावर सहज मात करतात . किंबहुना त्यांच्याइतकी सुखी जोडी दुसरी कोणती हि नाही ! तंत्रज्ञानामुळे जीवन जरी वेगवान झालं असाल तरी याच तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला आत्मकेंद्रित बनवलं . त्यामुळे वात्सल्य ,त्याग , विनम्रता , विश्वासआणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम ह्या गोष्टी हळू हळू मनातून हद्दपार होऊ लागल्या आणि त्यांची जागा अहंकाराने घेतली. प्रेम आणि आदर ह्या गोष्टी गरजेपुरत्याच राहिल्या . पैसा गाडी बंगला सर्व काही आहे पण सुख काय म्हणतात ते कधी अनुभवलच नाही अशी परिस्थिती बहुतांशी होते . काय करावं - नातं हे मनातील भावनाच्याच खेळावरती अवलंबून असत ,हे जोपर्यंत समाजाला , समाजाला कशाला आपल्यापासूनच सुरवात करूया - जोडीदार निवडतांना आपल्यामध्ये ह्या सातही गोष्टी आत्मसात करावयास शिकाव्या , जोडीदार होणाऱ्या कुटुंबाशी नुसतेच औपचारिक बोलण्या ऐवजी त्यांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा ..पैसा जीवनात आरामदायी सुखवस्तू निश्चितच देईल पण सुख मिळेलच असे नाही .आपण ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य सुरु केलं आहे ,तेव्हा सुरवातीच्या काळात त्याला समजून घेतलं तर पुढील आयुष्यात ते उपयोगी ठरेल . विशेष करून स्त्रियांचा हरवलेला पैलू " आई " होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जोडीदारामध्ये हवा तसा बदल घडू शकेल आणि दोघांमधील नातं निश्चितच घट्ट होईल लक्षात ठेवा - .आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.

भिन्न संस्कार ,  भिन्न परिस्थियतीतीत  वाढलेली माणसे एकत्र राहू लागतात तेव्हा नेमकं काय करणं आवश्यक आहे , घटस्फोटापर्यंत का वेळ यावी या सर्वाचा उहापोह पुढील लेखात ....

घटस्फोट ? का ? आणि कशासाठी । Divorce ? Why ?



प्रिय आईस ,


 प्रिय आईस ..


                     आई ---

                              उतू गेलेल्या दुधावरची साय .... प्रेमाची सर्व नाती जपणारी .....  गेले कित्येक वर्षात तुझा स्पर्श तर नाहीच पण तुझी माझी साधी भेटही नाही. तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ ,मनातील तळमळ , या वेदना कुणाला सांगू , राहवलं नाही , निदान अश्रूंची शाई करून कागदावर लिहून मन मोकळं करावं .

                        आई ---

                               तुझा स्पर्श , तुझ्या कुशीत शिरून घळा घळा रडावं असं खूप खूप वाटत ,पण तुझी वाट पाहूनच डोळे सुकले. बाळाला कुशीत घेऊन त्याच पोट भरून तृप्त होणारी तू-- कुठे गेलं तुझं मातृत्व.जन्म देणारी एक जन्मदात्री इतकीच तुझी आता ओळख राहावी . कुत्री मांजरीची पिल्ले त्यांच्या आईच्या कुशीत शिरतांना आजही दिसतात दगडाच्या सुंदर मूर्ती घडविणारे मूर्तिकार हि दिसतात पण आपल्या पिल्लांना संस्काराचे बाळकडु पाजून त्यांचे उज्वल भवितव्य घडविणारी तू मात्र अलिप्त झालीस. आई चे दूध म्हणजे अमृत - पण हे अमृत पाजायलाच तू आता नाकारतेस. तू बदलली आहेस . हो तू नक्कीच बदलली आहेस , स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरणारी तू आता स्वतःच्याच भुकेचा विचार करतेस . दुष्ट प्रवृत्ती पासून परावृत्त करण्याची तुझी शिकवण -- याची तुला आता गरजच वाटत नाही - त्यामुळे आम्ही भरकटलो आहोत , प्रवाहात कसेही वाहत आहोत ! घर - केवळ जिच्या मुळे - प्रेम , वात्सल्य , त्याग , ओढ ,घरात इकत्र नांदत , त्याच घरात आता तू पाहुणी म्हणून राहतेस भाडोत्री असल्यासारखी ! केवळ रस्त्यावर आम्हाला सोडता येत नाही म्हणून पाळणा  घरात भरती करतेस . नाईलाज असा हा शब्द कि समर्थन करावयास पुरेसा होतो . मानव आणि मानवतेला जन्म देणारी तू आता तुझाच जन्म हे जग नाकारताय ! या युगात तुझी माझी कधी भेट होईल हि आशाच मी सोडून  दिली आहे . वेदना असह्य होतात पण डोळेही कायमचे मिटता येत नाहीत , आई  विना घडलेला हा समाज त्याच्याकडून तरी कोणती अपेक्षा करावी ? नरपशू घडत आहेत , तूच सांग मी काय करू ?

      तुझं लेकरू 

जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna । भाग १



काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .

अधिक - उणे

भल्या मोठ्या पगाराची नोकरी करणारा निवडला तर , सर्व सुविधांनी युक्त असलेलं आरामदायी आयुष्य जगता येईल ,पण महत्वाचे म्हणजे नवऱ्याचं दिनमान पूर्णपणे घड्याळाने नियंत्रित केलेलं, कौटुंबिक सुख मिळेल का , दिवसाचे काही तास तरी नवऱ्या समवेत घालवता येतील का ? बहुतेक याचे उत्तर “ नाही “ असेच आहे.

गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला निवडावा तर सुरवातीला आर्थिक चणचण भासू शकते , आरामदायी आयुष्य नाही जगता येणार , व्यवसाय जरी असला तरी आपल्या मनाचे राजे , कुणाची पराधीनता नाही , व्यवसायात नवऱ्याला मदत केली तर निश्चितच त्याच्या समवेत व्यवसाय व्यतिरिक्त वेळ मिळू शकेल , व्यवसाय उत्तम चालला तर आरामदायी आयुष्य हि मिळू शकत .

एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेती असलेला निवडला तर - शहरात मिळणाऱ्या सुख सुविधा कदाचित नाही मिळणार , थोडं कष्टमय जीवन हि असू शकेल , पण नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा जीवन धकाधकीचे नसेल , जास्तीत जास्त कुटुंबासाठी वेळ नवरा देऊ शकेल . शेवटी लग्न कशासाठी करावयाचे ? आपल्याला नक्की काय हवं आहे ?

अपेक्षा काय ?

लहान पणापासून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो , आणि आता तर काय तंत्रज्ञानामुळे सारं जग आपल्याला पहायला मिळतं. मोठे होतो नोकरी हि मिळते पण आयुष्यातील महत्वाची गोष्टच आपण शिकत नाही ती म्हणजे भावी आयुष्यात आपण काय केलं म्हणजे आपण कायम आनंदी राहू ? समाजातील इतरांची परिस्थिती बघून आपण ठरवतो आपण काय करायचं ! पण खरंतर हेच फसवं असतं कारण यात नुसते अनुकरणता असते विचार नसतो . आणि जिथे विचार नसतो तिथे यशस्विता जन्म घेत नाही . आपण काय केलं म्हणजे , आपल्याला काय मिळाले म्हणजे , आपण आनंदी सुखी राहू याचा प्रामाणिक विचार कधीच करीत नाही , समाजात काय करतात हे पाहूनच आपण ठरवतो , आणि मग कधी कधी असंही होतं कि आपली आर्थिक प्रगती तर खूप केली पण तरीही आयुष्य असं पराधीन , असमाधानी का वाटतं ?

जोडीदाराची निवड


आपण जर कुटुंब वत्सल असू तर लग्न हे ठराविक वयापर्यंतच होणे आवश्यक आहे . हि कुठली रूढी ,परंपरा , संस्कृती वगैरे काही नाही निव्वळ कौटुंबिक व्यवहार आहे आणि तो म्हणजे आईबापाची सेवा निवृत्तीची वेळ येण्या आधी मुलगा / मुलगी मिळवती व्हायला पाहिजे ! नाहीतर होत असं आईवडील खूप वयस्कर होतात आणि मुलगा / मुलगी कॉलेजचे शिक्षण घेत असतो/असते .या मुळे कुटुंबावर म्हणजेच आईवडिलांवर काय परिस्थिती ओढवते हे सुज्ञास सांगणे न लगे . याचा अर्थ असाही नाही कि येईल ते स्थळ स्वीकारायचं आणि आयुष्याची माती करायची आणि या साठीच “ जोडीदाराची विवेकी निवड “ आवश्यक असते.

सर्वसाधारण महत्वाच्या मानल्या गेलेल्या सार्वत्रिक अपेक्षा..........

१) मुलाला चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर आणि मोठ्या पगाराची नोकरी असायला हवी

२) स्वतःचे मालकीचे राहते घर , मोठा ब्लॉक असेल तर उत्तमच

३) मोठा कौटुंबिक गोतावळा असता नये , सासू सासऱ्यांपर्यंतच ठीक आहे ते वेगळे रहात असतील तर उत्तमच

४) स्वतःचा व्यवसाय असेल तर स्वतःचा बंगला गाडी ( चार चाकी कर } असायलाच हवी

५) मुलगा मोठ्या शहरातच राहणार असायला हवा

६) मुलाकडे कितीही सुबत्ता असली तरी ग्रामीण भागातील नको


या आणि अश्या प्रकारच्या अटींनी निवडलेल्या जोडीदाराकडून खरंच वैवाहिक आणि कौटुंबिक सुख आणि समाधान मिळेल का ?

जोडीदाराची विवेक निवड करतांना कोणता विचार , आपला आणि मुलाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन , आपल्याला नक्की काय पाहिजे याचा स्वतःशी प्रामाणिक विचार यावरील विवेचन लेखाच्या दुसऱ्या भागात


आपणही आपल्या प्रतिक्रिया देऊन त्या प्रतिक्रियांचा समावेश आपल्या नावासकट पुढील लेखात करता येईल.

यावर चर्चा होणे आवश्यक आहे.
भाग २ .....

Next

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।।                                     आषाढ अमावस्या - दीप अमा...