चाकर मानी

                                                                                     । ।   श्री   । । 


चाकर मानी
 

                         शब्दाचा इतिहास 


एक सत्तर ऐशी वर्षांपूर्वी कोकणात उत्पन्नाचे साधन काहीच नव्हतं , म्हणजे शेती होती पण एकाच कुटुंबाला पुरेल इतकी , मुलगे त्यांच्या पत्नी त्यांची मुले , कुटुंब वाढत गेलं , आणि शेती खूपच अपुरी पडायला लागली . मुलांना उत्पन्नाची साधनं  शोधण्याची गरज भासली , त्यावेळी कोकणात व्यवसाय हा दृष्टिकोन एक कल्पनाविलास होता , नोकरी / चाकरी करणे हा एकमेव पर्याय होता , बरं   नोकरी कोकणात मिळणे कठीणच , शिक्षण हि गोष्ट पूर्णपणे ऐच्छिक होती.  ज्याला  त्यावेळी शिक्षणाचे महत्व कळले तेच शिक्षण घेत, पण ती सुद्धा पाच ते दहा टक्के  , त्यामुळे शहरात जाऊन नोकरी करणे हाच एकमेव पर्याय राहिला . त्यात काही तरुण शहरात जायला मिळते म्हणून नोकरी करत , तर काही अगदी मना विरुद्ध इच्छा नसतांना जबरदस्तीने नाईलाजास्तव शहरात नोकरीला जात होते.

आता सणासुदीला जेव्हा हे तरुण गावाकडे रजा काढून येत. तेव्हा गावात राहणारी मंडळी त्यांना “ या चाकरमानी “ असे कौतुकाने म्हणत असत . नोकरी करणारा तो चाकर मानी , यात कमीपणाची कुठलीही भावना नव्हती . कारण चाकरी करण्याची किती गरज आहे हे प्रत्येक गावात राहणाऱ्याला माहित होत . आणि म्हणूनच ‘ या चाकरमानी ‘ असे म्हणतांना त्यात प्रेम कौतुक आदर होता . 

कालांतराने दृष्टिकोन बदलतात त्यामुळे काळ बदलतो ,आणि चाकरमानी उपहासात्मक म्हणू लागले , कमीपणाचे वाटू लागले त्यामुळे काही बुद्धिहीन असलेले बुद्धिवान , चाकरमानी यांना कोकण वासी म्हणू लागले 

पण या तथाकथित बुद्धिवाद्यांना हे कुठे समजण्याची अक्कल आहे कि - कोकणात राहणार स्थायिक त्याला कोकणवासी म्हणतात आणि जो नोकरी करणारा तो चाकरमानी , सध्याचा काळात  जो कोकणात नोकरी करतो तोहि  चाकरमानी च असतो    

                                                    Vinata Social media 


फॉरवर्ड करण्याची संस्कृती

 आठवतात ते दिवस

आजची forward करण्याची संस्कृती .......
मी मध्ये एका संगीत गाण्याच्या ( live instruments ) स्पर्धेला गेलो होतो . अर्थातच माझ्या मित्राने त्यात भाग घेतला होता. आपल्या नित्यनियमा प्रमाणे पाहुण्यांचे व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत आभार प्रदर्शन झालं. आणि वेळ जाऊ नये म्हणून आयोजकांनी लगेच कार्यक्रमाला सुरवात करावी अशी घोषणा केली . साऊंड सिस्टिम वाल्याची धावपळ सुरु झाली कसेबसे त्याने पटकन माईक लावून घेतले कार्यक्रम सुरु झाला . आता गाण्यांचा कार्यक्रम , त्यातून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजिचा साऊंड त्याला जवळ पास पाच पन्नास विशिष्ठ ऍडजेस्ट मेन्ट केल्याशिवाय तो नीट येतच नाही. बरं त्या टेकनॉलॉजिचा अभ्यास त्या ऑपरेटरचा किती आहे हा एक संशोधनाचाच विषय असतो . व्हायचे तेच घडले पहिल्या स्पर्धकांचा आवाज काही नीट आला नाही , त्यामुळे त्याच्या गाण्याची काशी झाली . आणि आताचे परीक्षक ऍडव्हान्स टेकनॉलॉजि वापरल्या शिवाय गायकाचे कौशल्य समजण्याची त्यांची क्षमता नाही .काल संगीत शिकावयास घेतले आणि आज परीक्षक झालो . मीडियाची कृपा ! त्यामुळे पहिले दोनतीन स्पर्धक साउंड बरोबर नाही म्हणून बाद झाले. ( हा त्यांच्यावर अन्यायच झाला नाही का ? ) पण हे बघतो कोण अगदी अयोजकांसकट आम्ही फक्त forward करणारी मंडळी. विचार आमचे थांबलेले आहेत , अभ्यास करण्याची प्रवृत्ती पूर्णपणे संपुष्टात आली आहे . आवाज येतो आहे ना बस झालं .
तो काळ मात्र असा नव्हता , दोनतीन माईक आणि एक साधे लोकांपर्यंत आवाज पोचेल याच क्षमतेचे मशीन. परीक्षक म्हणून जाण हेच सन्मानाचे प्रतीक होते .. त्यामुळे परीक्षकांचा अभ्यास त्याचे अनुभव त्यांची संगीतातली तपश्चर्या हे सर्व पाहूनच परीक्षक म्हणून बोलावीत असत आणि व्यवहार जमला नाही म्हणून परीक्षकाला बोलावता आले नाहीं असें कधीच व्हायचे नाही कारण किती रकमेचे मानधन हा दृष्टिकोनच नव्हता. गायकाचा आवाज परीक्षका पर्यंत पोचणं हेच महत्वाचे होत साऊंड सिस्टीम आवाज जरी गुणवत्तेने उच्चं नसला तरी गायकाचे आणि इतर कलाकारांचे गुणकौशल्य समजण्याची परीक्षकांची क्षमता होती . त्यामुळे कोणत्याच स्पर्धका वर कोणत्याच गोष्टी मुळे अन्याय होत नसे . या विषयावर खूप काही सांगण्यासारखे आहे . पण तूर्तास इतकेच बास नाहीतर अजीर्ण होईल
तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी सर्वांनाच स्पर्धका पासून आयोजकांपर्यंत अभ्यासाची कष्ट घेण्याची गरज आहे. आजच्या फॉरवर्ड करण्याच्या संस्कृतीत ते बसत नाही.
धन्यवाद Vinata Social


 

मुंबई लोकल ट्रेन
#सर्व लोक एकाच वेळी इतकी चेंगराचेंगरी करून हीच गाडी मिळाली पाहिजे असा आग्रह का धरतात ? ,
प्रत्येक जण कुठेना कुठे पोटापाण्यासाठी नोकरी करणारा नोकरदार असतो. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे नोकरीला जाता येत नाही हि वस्तुस्थिती आहे ,
प्रत्येकाला वेळेची बंधने असतात , उशिरा नोकरीवर गेलं तर नोकरीवर गदा, मग काय करणार अगतिक होऊन चेंगराचेंगरीतून जाणे भाग पडते ,
सगळ्यांच्या ऑफिस च्या वेळा एकच मग बिचारे नोकरदार तरी काय करतील अश्या ह्या लोकांच्या अगतिकतेचा कोणत्याही शासनाने चुकून तरी विचार केला आहे का ?
#आता अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जनताही तितकीच जबाबदार आहे
त्यांना शहरातील जीवन शैलीचे फार आकर्षण , म्हणजे असे कि मोठ्या शहरातील नोकरी सोडून इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी मिळाली तरी ती नाकारतात , मुंबईसारख्या मोट्या शहरात इतक्या त्रासदायक अडचणी असूनही मुंबईतच स्थायिक व्हायचे असा अट्टाहास का ?
# मग ह्या लोकलच्या गर्दीवर प्रशासन जो काही मार्ग काढेल तो जनतेला मान्य करावा लागेल
#अनेक वेळा असेही होते कि कॊटुंबिक आर्थिक स्थिती चांगली नसल्या मुळे अनेक तरुणांना मर्जी विरुद्ध मोठ्या शहरात नोकरी करणे भाग पडते
अश्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे , हि परिस्थिती काही एकदोन वर्षात झालेली नाही. माझ्या माहिती प्रमाणे गेली तीस चाळीस वर्ष हाच रगडा चालू आहे .
# याचे एका वाक्यात उत्तर मिळणारे नाही , आणि एखादी कृती करूनही हा प्रश्न सुटणार नाही
# ज्यांना मुंबई सोडून अन्य ठिकाणी स्थायिक होणं शक्य असेल तर त्यांनी त्वरित विचार करावा .
# तसेच ज्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा मोठ्या शहराच्या बाहेर असणाऱ्या शाखांमध्ये रुजू करता आलं तर पाहावे .

आठवतात ते दिवस .................01

आठवतात ते दिवस .................

मला अजूनही आठवतंय , १९८५/८६ चा काळ असावा त्यावेळी मुंबईला आम्हा कलाकारांचा एक ग्रुप होता. नेहमीचेच कार्यक्रम नको म्हणून आम्ही , आज “ होऊन जाऊदे धिंगाणा “ नावाचा जो कार्यक्रम आज दूरदर्शन वर चालतो तश्याच पद्धतीचा एक कार्यक्रम मुंबई दूरदर्शनवर करण्यासाठी आम्ही बसवला.
१९७२ साली मुंबई दूरदर्शन चा स्टुडिओ सुरु झाला , पहिले “ मुंबई दूरदर्शन “ हेच नाव होत नंतर “ सह्याद्री “ झालं . त्या वेळेला आजच्या सारखा पैशांचा खेळ नक्कीच नव्हता
आणि याकूब सईद आणि बबन प्रभू हि जोडगोळी खूपच प्रसिद्ध होती. याकूब सईद हे कार्यक्रम हेड असल्यामुळे कार्यक्रम सादर करावयाचा असेल तर त्यांना भेटावं लागायचे
. त्यांच्या भोवती आजच्यासारखे ग्लॅमरस वलय नव्हतं आणि त्यामुळे त्यांची भेटही सहज होत असे. आम्ही आमच्या कार्यक्रमाची संकलपना सांगितली आणि थोडी कार्यक्रमाची फित हि दाखवली .त्यांनी पहिली आणि आम्हाला ऑफिस मध्ये घेऊन गेले. " कसं आहे वेलणकर " ते बोलते झाले तुम्ही कार्यक्रम कसा सादर केला आहे हे आम्ही पाहतोच पण त्याचा प्रमाणे काय सादर केले आहे हेही पाहणे गरजेचे आहे ,तुम्ही चांगल सादर केले असल तरी असा पोरखेळ आम्ही नाही दाखवणार , अस्या प्रकारच्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना गोडी लागली तर रोज आम्हाला असे पोरखेळच करावे लागतील , तेव्हा सॉरी , आपल्याकडे चांगले चांगले लेखक आहेत त्यांच्या नाटिका सादर करा आपण नक्की दूरदर्शन वर दाखवू.
त्यानंतर आमच्या ग्रुपचे नाटक झालं , कीर्तन हि झाले शालेय कार्यक्रम केले ,सेलिब्रेटींनीच कार्यक्रम सादर करावे अशी संकुचित वृत्तीही नव्हती असो पण आम्हाला धिंगाणा काही घालू दिला नाही ( त्यांच्या भाषेत पोरखेळ )
" अस्या प्रकारच्या कार्यक्रमाची प्रेक्षकांना गोडी लागली तर रोज आम्हाला असे पोरखेळच करावे लागतील "त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार काही प्रमाणात आज खरे ठरले हे नक्की !

 

 


ती फुलराणी 

best TV सीरिअल 


सोनी मराठी वरील ऑगस्ट २०१८ पासून प्रसारित झालेली “ ती फुलराणी “ नुकतीच सिरीयल पहिली आणि दोन तीन दिवस खूप अस्वस्थ वाटत होत .
चैन पडत नव्हतं , काय करावं काही कळत नव्हतं . कशातच लक्ष लागत नव्हतं.
का ? का ? का अशी अवस्था झाली ?, एकदा दोनदा तीनदा सारखे पुन्हा पुन्हा एपिसोड पाहत होतो तरी मन समाधानी होत नव्हतं.
बुद्धीने सांगितलं …. असे व्हायला एकच कारण "मयुरी वाघ" . हो…. मनाने हि कौल दिला , हेच कारण
त्यावेळी ती सीरिअल किती पॉप्युलर झाली माहित नाही कदाचित मीडिया वाल्यांना भावले नसेल.आणि तसंही आज कलाकारांना विचारतो कोण कारण कला हे क्षेत्रच मीडियाच्या हातात गेलं आहे किंबहुना पैसाच ठरवतो कलाकाराचे कौशल्य . मयुरीच्या एका मुलाखतीतही असे दिसून हि आले कि आज कलाकाराच्या गुणांना कोण विचारतो !
सीरिअल मधील नायक सांगायचा तू न बोलताच तुझ्या मनातले कळत मला , हि नुसती नायकाची शब्द फेक नसून प्रेक्षकांनाही समजत होत मंजिरीला काय म्हणायचं आहे .केवळ तिचा चेहरा आणि डोळे पाहून वास्तवातच अशी मंजिरी व्यक्ती आहे कि काय अशी मनात शंका येऊ लागते. आणि वाटत मंजिरी सारखी मुलगी प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात यायला हवी .
यु ट्यूब वरचा मयुरीचा प्रत्येक एपिसोड वास्तवात जगावा तसा मी जगत होतो .प्रत्येक एपिसोड मध्ये मंजिरी अस्वस्थ करायची चेहऱ्यावर उमटणारे भाव आणि शब्दांविना बोलणारे डोळे " निव्वळ अप्रतिम "
यावरून समजत कि त्या व्यक्तिरेखरला मयुरी वाघ ने किती न्याय दिला आहे ,
अस्वस्थता जात नव्हती डोळ्यासमोरून व्यक्तिरेखा हलत नव्हती
डोळ्यासमोर मयुरी वाघ असतांनाच एक व्यक्तिरेखा उभी राहिली आणि एकत्र कुटुंबाचे महत्व सांगणारी हृदय हेलावणारी "संघर्ष " नावाची कथा फुलू लागली आणि मनातील अस्वस्थता कमी झाली. लवकरच शॉर्ट फिल्म स्टोरी प्रसारित होईल .
ती फुलराणीच्या टीम चे खूपखूप धन्यवाद कि मयुरी वाघ सारख्या गुणी अभिनेत्रीला मंजिरी हि व्यक्तिरेखा साकारायला दिली . एकूणच ती सीरिअल मनाला स्पर्शून जाते .
१९७५ चा काळ असावा त्यावेळी पु ल देशपांडे लिखित " ती फुलराणी " नाटक स्टेजवर आलं . तेव्हा मी सातवीत शाळेत शिकत होतो. त्यावेळी मी माझ्या कुटुंबाबरोबर ते नाटक पाहिलंही असेल , पण आता लक्षात नाही . आणि नाटक समजून लक्षात राहील असं माझं वयही नव्हतं .
अश्या गुणी अभिनेत्रीला उत्तरोत्तर अश्याच आव्हानात्मक भूमिका मिळाव्यात हीच ईश्वर चरणी प्रार्थना
- गणेश वेलणकर

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।। 


                                  आषाढ अमावस्या - दीप अमावस्या 

                                     सोमवार १७ जुलै २०२३ रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच  दीप अमावस्या आहे. आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या पूजांच्या तयारीसाठी घरातील सर्व दीप स्वच्छ करून भक्तिभावाने पुजले जातात . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप मांगल्याचे प्रतीक आहे .दीपपूजन करून गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतात , दीप आरती म्हणतात .सर्वदिप प्रज्वलित करून पूजा करतांना इतकं प्रसन्न आणि आनंदमय वातावरण होत.आणि एक उत्साहाची लहर शरीरात उत्पन्न होते .

या दिवशी मांसाहार करून पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत मांसाहार करीत नाहीत .पण सध्या या बेधुंद आणि बेबंध राहणाऱ्या काही समाज कंटकांनी गटारात लोळण्याची वेळ येईपर्यन्त दारूच्या बाटल्या ढोसून so called " गटारी अमावस्या " म्हणून या दिवसाची निर्बत्सना केली . आणि दुर्दैव असे कि सोसिअल मीडियावर मुद्दाम मुद्दाम गटारी अमावस्या म्हणून उल्लेख केला जातो काही वाहिन्यांनी तर कहरच केला - चित्रपटाची जाहिरात करतांना " गटारी स्पेशल " म्हणून उल्लेख करतात . खरंतर दारू ढोसणाऱ्याला दिवस आणि मुहूर्ताची काही गरज नसते - आली लहर केला कहर अशी त्यांची अवस्था असते . पण जाणूनबुजून संस्कृती बद्दल गैरसमज वाढवणाऱ्या या वळवळत्या किड्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ज्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते अबाधित राहत हे पक्के ध्यानात ठेवाव

अनेक साईटवर दीप अमावास्येची माहिती दिलेली असते , आणि काही साईटवर शेवट अशी टीप लिहिलेली असते कि " येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. " बरोबरच आहे कारण शास्त्राला " अनुभूती " म्हणजे काय हे कळतच  नाही , शास्त्र तिथपर्यंत पोचूच शकत नाही मग  शास्त्र कसले पुरावे देणार !

                                                                                                                      ...... मालकंस 

  अधिक मास 

                                                                   पुरुषोत्तम मास 


                                             आपली हिंदू कालगणना , पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती , पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती या तीन  परिमाणांवर केली जाते म्हणजेच सौरवर्ष आणि चांद्र वर्ष . या तीन  गतींमध्ये दरवर्षी अकरा दिवसांचा फरक पडतो .आणि हा फरक भरून काढण्यासाठी बत्तीस  महिन्यांनी  अधिक मास घेतला जातो ज्या महिन्यात रवीची संक्रांत होत नाही .आणि हा काळ आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यांमध्ये असल्यामुळे अधिक श्रावण येतो .

                                       अधिक महिन्यात , मुलगी आईची ओटी भरते तसेच जावयाला , ब्राह्मणाला , गाईला अधिक महिन्यात वाण देतात अधिक मास - या वर्षी - १८ जुलै २०२३ प्रतिपदा  ते १६ ऑगस्ट २०२३ अमावस्या .

                                      बाकी आपण श्रावण सोमवार  , इतर उपवास , व्रत वैकल्य पारायण वाचन हे श्रावण महिन्यातच करावे . श्रावण मास -  या वर्षी - १७ ऑगस्ट २०२३ प्रतिपदा  ते १५ सप्टेंबर २०२३ अमावस्या

         या वर्षी श्रावण सोमवार - २१ ऑगस्ट २०२३ /  २८ ऑगस्ट २०२३ /  ४ सप्टेंबर  २०२३ / ११ सप्टेंबर  २०२३

अधिक महिन्यात दशमी , एकादशी , द्वादशी पौर्णिमा या दिवशी दान देतात .अधिक महिन्यात गंगास्नान हि करावे . अनारसे ,बत्तासे पेढे यांची दान दिली जातात . 

                                अधिक  मासात विष्णू स्वरूप कृष्णाचे महत्व असल्यामुळे कृष्णाला अधिक मासात दररोज तुळशी वाहून लोण्याचा नैवेद्य दाखवतात 

                                                                                                  ..................................मालकंस 

                                                                                                                          विनता उद्योग समूह 

वैवाहिक जीवन - विनता सोसिअल - मराठी - भाग १ - Vaivahik Jivan - Part १

                                        वैवाहिक जीवन 

भाग १
                " आमच्या वेळी असं होत ,,आमच्या वेळी तसं होत ,,  आम्ही खरं आयुष्य जगलो " 
                       छे ,ऐकून ऐकून कंटाळा आला आहे , जुन्या  काळातलं सांगत राहतात 
                 अहो काळ किती बदलला आहे , आता जुन्या गोष्टी काही राहिलेल्या नाहीत .
               खूप बदललेल्या आहेत 
कोण  सांगणार यांना ?
गोष्टी बदलेल्या आहेत ? खरंच असं वाटत ?
साठ सत्तर वर्षांपूर्वी पुरुष जसा होता तसाच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी स्त्री जशी होती तशीच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी दोचांमध्ये ज्या भावना होत्या त्या आजही आहेत 
संतती होण्यासाठी दोघांनी एकत्र येणं हे आजही गरजेचं आहे जे पूर्वीही होत
स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांचा सहवास , हवाहवासा आजही वाटतो .
या सर्व जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत त्या आजही तश्याच आहेत 
मग बदललं काय ?
" विचार "
" तंत्रज्ञान "
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला !
विचार बदलले तसे आचारही बदलले .
विचार बदलले  तश्या अपेक्षा . राहणीमान , भावनांचा अग्रक्रम बदलला 
तंत्रज्ञानाचा पगडा विचारांवर इतका पडला कि 
काय करावं , काय करू नये , याचा सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली 
 प्रेम वात्सल्य ,त्याग ,आदर, विनम्रता , विश्वास  ,संयम आणि स्वार्थ .या भावना आजही मनात आहेत 
पण .......
भ्रामक सुखाच्या अति मागे लागल्यामुळे स्वार्थ या भावनेने बाकी भावनांना बांधून ठेवलं
चार भिंतीत एकत्र राहत असले तरी एकमेकांपासून फार दूर 
मी आणि माझं विश्व् या भोवतीच फिरत राहिलो .
सामाजिक विचारांच्या बदला मुळे
स्त्री घराबाहेर पडली , पूर्वी   कधी जे तिने विश्व् बघितलं नाही त्या विश्वात ती लीलया रमायला लागली.
स्त्रीच्या आचारतेत झालेला हा बदल खरंच व्यक्ती म्हणून निर्विवाद कौतुकास्पद आहे .
पण हे कौतुक काही अंशी पुरुषाला मानवल नाही . 
आणि 
जीवन होडीच्या मध्यावर हातात हात घालून उभी असलेली ती दोघं 
होडीच्या दोन टोकावर जाऊन राहिली .


  

कलेचा बाजार


    ।। श्री ।।


                                                      बाजार 


मला अजूनही आठवतात ते दिवस साधारण सन १९८४ /८५ चा काळ असेल , त्या वेळी मुंबई दूरदर्शन वर “ गजरा “ म्हणून एक कार्यक्रम असे. त्यावेळच्या प्रसिद्ध लेखकांनी लिहिलेले , त्यामध्ये छोटे छोटे प्रवेश असत कि ज्यामधून , विनोदी ,गंभीर ,सामाजिक प्रश्न ,समाजातील अनेक व्यक्तींच्या स्वभावाचे पैलू , अश्या विविध अंगांनी हा कार्यक्रम सादर व्हायचा . विशेष म्हणजे  दूरदर्शन वरचा प्रेक्षक वर्ग आठवड्यातून एकदाच असला तरी वार  लक्षात  ठेऊन आतुरतेने पाहत होता कारण तो अत्यंत जिवंत होता ,उत्कृष्ठ लेखन , दिग्दर्शन कलाकार ,सर्व सर्वच अफाट असायचं कलेतील आविष्कारांचे सुंदर दर्शन घडत असे . महत्वाचे म्हणजे दूरदर्शन वरच्या कार्यक्रमाची लोकप्रियता हि कलाकारांवर ठरत असे ! त्यामुळे  प्रमोशन , वारंवार कार्यक्रमाच्या जाहिराती हे करण्याची गरजच नव्हती कारण जे मुळातच उत्कृष्ठ आहे ते सारखे सारखे कधीच सांगावं लागत नाही कि हे उत्कृष्ठ आहे !. फुल खिले हैं गुलशन गुलशन , आपली माती आपली माणसं  , चित्रहार नाटक एकांकिका मुलाखती लहान मुलांसाठी किलबिल 

         त्यावेळी दूरदर्शन वरचे कार्यक्रम मोफत होते पण दर्जेदार होते. 

हे आज प्रकर्षाने आठवलं कारण “ तुला शिकवीन चांगलाच धडा “ सीरिअल पाहून...... 

वडिलांचा लाथेने फेटा उडवला जातो इतका त्यांचा अपमान होतो  तसेच हाडाची शिकशीका असतांना तिच्या पावित्रावर  शंका घेणारे खोटारडे आरोप केले जातात . असे असतांना हि ती शिक्षिका मी कशी पवित्र आहे याचे लाजिरवाणी समर्थन देते आहे .  

वास्तविक हे सर्व पाहिल्या आणि ऐकल्यानंतर तिच्या पायाची आग मस्तकात जायला हवी होती .  “ कुणा कुठल्या  गुंडाने सांगितलेलं तुम्हाला खरं  वाटत. आणि माझ्यावर तुमचा विश्वास नाही . आज लग्नाच्या दिवशी इतका अविश्वास मग लग्न झाल्यावर मला “ बाजारी औरत “ म्हणूनच घोषित कराल , मलाच तुमच्या या नंदीबैलाशी लग्न करायचं नाही , ताबडतोब चालते व्हा इथून ”.व्यक्तिरेखा हि त्याच्या स्वभाव आणि विचारांप्रमाणे वागत असते हेच आताच्या लेखकांना समजत नाही . 

         27 जून २०२३ चा भागाचं  लिखाण तर इतकं दयनीय होत कि सीरिअल पाहणेच सोडून दिल .    आजच्या एकूण मराठी दूरदर्शन वरच्या सीरिअल बघून एकूणच निर्मितीची दयनीय अवस्था झाली आहे , 

आज कार्यक्रमाचा दर्जा कलाकार नाही , तर मीडिया म्हणजे पर्यायाने multinational कंपन्या ठरवतात . बाजारात विक्रीला असलेल्या वस्तू प्रमाणे !


                     असेच दर्जेदार लेख वाचण्यासाठी यावर क्लिक करा 


Ajab Nyay - अजब न्याय सरकारचा


                            सेवा न देताच वसुली 

                               सरकारचा अजब न्याय 

 आता वेगवान निर्णय घ्यायचे म्हणजे हुकूमशाही करावीच लागणार नाही का ?

           लोक अदालतची  हि जनतेला गुगली 


 BSNL ने  landline ग्राहकांकडून सेवा न देता बिल वसुली केली . देवगड मधील BSNL कार्यालय अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचे सर्वश्रुत आहेच आणि प्रत्येक ग्राहकास त्याचा अनुभवही आहे .त्याचं  झालं असं मला १८ मार्चला २०२३ लोकअदालतचि नोटीस आली .तशी देवगड तालुक्यातील अनेक ग्राहकांना आली .जुलै ऑगस्ट २०२० चे landline चे बिल भरले नसल्यामुळे तडजोड करण्यासाठी ची ती नोटीस होती .माझा landline ५ मे २०२० पासून बंद होता म्हणून मी लेखी तक्रार केली , मे जून २०२० चे बिल मला आले , ५ मे पासून फोन बंद असल्यामुळे मी बिल काही भरले नाही .पुन्हा लेखी तक्रार केली , मला BSNL च्या अधिकाऱ्याने आश्वासन दिल कि हे मे जून २०२० चे बिल भरा  तुमचा फोन चालू करतो .फोन तर काही चालू झालाच नाही पण जुलै ऑगस्ट २०२० चे हि बिल आलं . मी ते बिल भरलं नाही . माझ्याकडे सर्व तक्रार केलेल्याच्या पोच पावत्या , बिल भरल्याची पावती सर्व काही होत .

लोकअदालतचि नोटीस आली आणि मला थोडं हायस वाटलं ,चला ग्राहकांच्या बाजूने आपली बाजू तरी न्यायालयात मांडता येईल निदान देवगड BSNL कार्यालय किती बेजबाबदार आहे हेतरी सांगता येईल , सेवा न देताच पैसे भरणा करा म्हणून नोटीस आलेले अनेक ग्राहक त्या दिवशी तिथे असणार याची मला खात्री होती , आणि त्यामुळे आपली बाजू मांडायला खूपच सोप्प जाणार होत .

देवगड च्या लोकअदालत  मध्ये वेळेत पोचलो. BSNL ग्राहकांची भेट घेतली आम्ही सर्वजण एकाबाजूला बसलो , बँका आणि कर्जदार यांच्या तडजोडी चालू होत्या , मी पुढेच बसलो होतो , न्यायाधीश साहेब मधेच विचारते झाले - तुमचं काय ? मी म्हटलं BSNL , ते लगेच म्हणाले इथे नाही मागच्या बाजूला , आमच्या सर्व BSNL ग्राहकांची वरात मागच्या बाजूला , चौकशी करता कळलं कि एक टेबल टाकून BSNL चे अधिकारी वसुलीसाठी बसलेले होते .एक देवगडचे आणि एक सावंतवाडीचे ! मी त्या अधिकाऱ्यांना विचारलं कि लोक अदालतचि नोटीस आहे ना मग न्यायाधीश साहेब ,  वकील आहेत कुठे , ? इथे ते कुणी नाही आमच्याबरोबरच तडजोड करायची आहे 

आणि मग त्या सरकारी अधिकाऱ्याने आपल्या सरकारी खाक्यात असं काही ग्राहकांना घेतलं कि अनेक जण अर्ध तर अर्ध बिल भरायला तयार झाले, मी म्हटलं मी नाही बिल भरणार, मग अधिकारी म्हणाले कोर्टाची नोटीस येईल तेव्हा तुम्हाला भारावीच लागेल , मी म्हटलं मग आटा माझ्या हातात नोटीस आहे ती कुणाची ?  नंतर त्याचे एकच  उत्तर तुम्ही  जाऊ शकता घरी .

नोटीस लोक अदालतचि,  पण बाजू ऐकणारे न्यायाधीश साहेब , वकील कुणीच नव्हते  , लोक अदालतचि नोटीस देऊन लोकांना सहज  फसवलं   मूळ मुद्दा - सेवा ना देताच बिल वसुली करत आहेत हि ग्राहकांची बाजू ऐकायला कुणीच नव्हते. मी हि तडजोड करून बिल भरून टाकलं. कारण   

लोक अदालतचि नोटीस देऊन जर लोक अदालत लोकांशी अशी वर्तणूक करणार असेल तर न्याय मागायचा कुणाकडे ? 

  त्या नोटीस मध्ये " तरी प्रकरण तडजोडीने निकाली होणे करिता दिनांक 30 एप्रिल २०२३ रोजी राष्ट्रीय लोकअदालत मध्ये ठेवण्यात येईल " असे स्पष्ट लिहिलेले आहे .आणि प्रत्यक्षात न्यायाधीश साहेब नाहीत वकील नाही आणि अदालत हि नाही सगळाच  बकवास !

-----गणेश वेलणकर , नाडण , देवगड 

जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna । भाग २

  जोडीदार निवडतांना । Jodidar nivadatanna ।

नातं ....

---- नातं म्हटलं कि त्याचा थेट संबंध मानसिकतेशी जातो , आणि मानसिकता म्हणजे भावनांचा खेळ ! भावनांचा खेळ आपल्या नात्याचे भविष्य ठरवत असतो आणि त्या भावना म्हणजे प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम

आजच हे धाकदगदीचे जीवन , बदललेला काळ असे म्हणून आपण जीवनातील या अत्यंत महत्वाच्या मानसिक पैलूंकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतो . हेच पैलू आपले जीवन सुखी करीत असतात..

बदललेले दृष्टिकोन ..... . गृहिणी - कुटुंबाचा आधारस्तंभ , कि जिच्यामुळे कुटुंबव्यवस्था अबाधित होती ,प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम या सर्व भावना तिच्या ठायी असायच्या आणि सर्वात महत्वाचे म्हणजे याची शिकवण कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याला देत असे आणि ती म्हणजे " आई " आता काळ बदलला म्हणजे समाजाने बदलला ,जीवनातील मूल्ये बदलली , जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला , तंत्रज्ञाना मुळे कुटुंबातील भावनांचा एक घट्ट बंध होता तो सैल झाला एकमेकांपासून दुरावले , एकाच छताखाली राहत असले तरी काहीसे एकमेकांना अनोळखी , मूल्य - उत्कृष्ठ भावी पिढी घडवणाऱ्या या आईचे मूल्य हा समाज म्हणजे पर्यायाने पुरुष समजू शकले नाहीत .प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम ह्या गोष्टी जिच्याठायी होत्या तिला प्रत्येक बाबतीत गृहीतच धरलं गेलं तिच्यावर वर्चस्व गाजवलं गेलं .कालांतराने ती करिअर साठी घराबाहेर पडली . आणि नात्यांमध्ये कटुता निर्माण झाली . आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस येण्याच्या मार्गावर राहिली . गरज कशाची - प्रेम वात्सल्य त्याग आदर विनम्रता , विश्वास ,आणि .संयम .ह्या सातही हि गोष्टी ज्या दोघां जोडादारांमध्ये आहेत त्यांचे नाते कधीही तुटू शकत नाही , कितीही संकटं आली तरी या सात गोष्टी संकटावर सहज मात करतात . किंबहुना त्यांच्याइतकी सुखी जोडी दुसरी कोणती हि नाही ! तंत्रज्ञानामुळे जीवन जरी वेगवान झालं असाल तरी याच तंत्रज्ञानाने प्रत्येक व्यक्तीला आत्मकेंद्रित बनवलं . त्यामुळे वात्सल्य ,त्याग , विनम्रता , विश्वासआणि सर्वात महत्वाचा म्हणजे संयम ह्या गोष्टी हळू हळू मनातून हद्दपार होऊ लागल्या आणि त्यांची जागा अहंकाराने घेतली. प्रेम आणि आदर ह्या गोष्टी गरजेपुरत्याच राहिल्या . पैसा गाडी बंगला सर्व काही आहे पण सुख काय म्हणतात ते कधी अनुभवलच नाही अशी परिस्थिती बहुतांशी होते . काय करावं - नातं हे मनातील भावनाच्याच खेळावरती अवलंबून असत ,हे जोपर्यंत समाजाला , समाजाला कशाला आपल्यापासूनच सुरवात करूया - जोडीदार निवडतांना आपल्यामध्ये ह्या सातही गोष्टी आत्मसात करावयास शिकाव्या , जोडीदार होणाऱ्या कुटुंबाशी नुसतेच औपचारिक बोलण्या ऐवजी त्यांचे अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा ..पैसा जीवनात आरामदायी सुखवस्तू निश्चितच देईल पण सुख मिळेलच असे नाही .आपण ज्या जोडीदाराबरोबर आयुष्य सुरु केलं आहे ,तेव्हा सुरवातीच्या काळात त्याला समजून घेतलं तर पुढील आयुष्यात ते उपयोगी ठरेल . विशेष करून स्त्रियांचा हरवलेला पैलू " आई " होण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच जोडीदारामध्ये हवा तसा बदल घडू शकेल आणि दोघांमधील नातं निश्चितच घट्ट होईल लक्षात ठेवा - .आजच्या बदलत्या काळात व्यक्ती स्वातंत्र इतकं फाजील बोकाळलं आहे कि सतत एकमेकांवर कुरघोडी करण्या पलीकडे कोणताही संवाद होत नाही .जगण्यासाठी पैसा निश्चितच आवश्यक आहे पण जगण्याचे ध्येय पैसा असू नये . जीवन हे बंधन युक्त असेल तरच सुखी होऊ शकत.

भिन्न संस्कार ,  भिन्न परिस्थियतीतीत  वाढलेली माणसे एकत्र राहू लागतात तेव्हा नेमकं काय करणं आवश्यक आहे , घटस्फोटापर्यंत का वेळ यावी या सर्वाचा उहापोह पुढील लेखात ....

घटस्फोट ? का ? आणि कशासाठी । Divorce ? Why ?



प्रिय आईस ,


 प्रिय आईस ..


                     आई ---

                              उतू गेलेल्या दुधावरची साय .... प्रेमाची सर्व नाती जपणारी .....  गेले कित्येक वर्षात तुझा स्पर्श तर नाहीच पण तुझी माझी साधी भेटही नाही. तुझ्या भेटीसाठी मी व्याकुळ ,मनातील तळमळ , या वेदना कुणाला सांगू , राहवलं नाही , निदान अश्रूंची शाई करून कागदावर लिहून मन मोकळं करावं .

                        आई ---

                               तुझा स्पर्श , तुझ्या कुशीत शिरून घळा घळा रडावं असं खूप खूप वाटत ,पण तुझी वाट पाहूनच डोळे सुकले. बाळाला कुशीत घेऊन त्याच पोट भरून तृप्त होणारी तू-- कुठे गेलं तुझं मातृत्व.जन्म देणारी एक जन्मदात्री इतकीच तुझी आता ओळख राहावी . कुत्री मांजरीची पिल्ले त्यांच्या आईच्या कुशीत शिरतांना आजही दिसतात दगडाच्या सुंदर मूर्ती घडविणारे मूर्तिकार हि दिसतात पण आपल्या पिल्लांना संस्काराचे बाळकडु पाजून त्यांचे उज्वल भवितव्य घडविणारी तू मात्र अलिप्त झालीस. आई चे दूध म्हणजे अमृत - पण हे अमृत पाजायलाच तू आता नाकारतेस. तू बदलली आहेस . हो तू नक्कीच बदलली आहेस , स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरणारी तू आता स्वतःच्याच भुकेचा विचार करतेस . दुष्ट प्रवृत्ती पासून परावृत्त करण्याची तुझी शिकवण -- याची तुला आता गरजच वाटत नाही - त्यामुळे आम्ही भरकटलो आहोत , प्रवाहात कसेही वाहत आहोत ! घर - केवळ जिच्या मुळे - प्रेम , वात्सल्य , त्याग , ओढ ,घरात इकत्र नांदत , त्याच घरात आता तू पाहुणी म्हणून राहतेस भाडोत्री असल्यासारखी ! केवळ रस्त्यावर आम्हाला सोडता येत नाही म्हणून पाळणा  घरात भरती करतेस . नाईलाज असा हा शब्द कि समर्थन करावयास पुरेसा होतो . मानव आणि मानवतेला जन्म देणारी तू आता तुझाच जन्म हे जग नाकारताय ! या युगात तुझी माझी कधी भेट होईल हि आशाच मी सोडून  दिली आहे . वेदना असह्य होतात पण डोळेही कायमचे मिटता येत नाहीत , आई  विना घडलेला हा समाज त्याच्याकडून तरी कोणती अपेक्षा करावी ? नरपशू घडत आहेत , तूच सांग मी काय करू ?

      तुझं लेकरू 

Next

चाकर मानी

                                                                                     । ।   श्री   । ।  चाकर मानी                            ...