वैवाहिक जीवन
भाग १
" आमच्या वेळी असं होत ,,आमच्या वेळी तसं होत ,, आम्ही खरं आयुष्य जगलो "
छे ,ऐकून ऐकून कंटाळा आला आहे , जुन्या काळातलं सांगत राहतात
अहो काळ किती बदलला आहे , आता जुन्या गोष्टी काही राहिलेल्या नाहीत .
कोण सांगणार यांना ?
गोष्टी बदलेल्या आहेत ? खरंच असं वाटत ?
साठ सत्तर वर्षांपूर्वी पुरुष जसा होता तसाच आजही आहे
साठ सत्तर वर्षांपूर्वी स्त्री जशी होती तशीच आजही आहे
साठ सत्तर वर्षांपूर्वी दोचांमध्ये ज्या भावना होत्या त्या आजही आहेत
संतती होण्यासाठी दोघांनी एकत्र येणं हे आजही गरजेचं आहे जे पूर्वीही होत
स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांचा सहवास , हवाहवासा आजही वाटतो .
या सर्व जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत त्या आजही तश्याच आहेत
मग बदललं काय ?
" विचार "
" तंत्रज्ञान "
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला !
विचार बदलले तसे आचारही बदलले .
विचार बदलले तश्या अपेक्षा . राहणीमान , भावनांचा अग्रक्रम बदलला
तंत्रज्ञानाचा पगडा विचारांवर इतका पडला कि
काय करावं , काय करू नये , याचा सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली
प्रेम वात्सल्य ,त्याग ,आदर, विनम्रता , विश्वास ,संयम आणि स्वार्थ .या भावना आजही मनात आहेत
पण .......
भ्रामक सुखाच्या अति मागे लागल्यामुळे स्वार्थ या भावनेने बाकी भावनांना बांधून ठेवलं
चार भिंतीत एकत्र राहत असले तरी एकमेकांपासून फार दूर
मी आणि माझं विश्व् या भोवतीच फिरत राहिलो .
सामाजिक विचारांच्या बदला मुळे
स्त्री घराबाहेर पडली , पूर्वी कधी जे तिने विश्व् बघितलं नाही त्या विश्वात ती लीलया रमायला लागली.
स्त्रीच्या आचारतेत झालेला हा बदल खरंच व्यक्ती म्हणून निर्विवाद कौतुकास्पद आहे .
पण हे कौतुक काही अंशी पुरुषाला मानवल नाही .
आणि
जीवन होडीच्या मध्यावर हातात हात घालून उभी असलेली ती दोघं
होडीच्या दोन टोकावर जाऊन राहिली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा