दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।। 


                                  आषाढ अमावस्या - दीप अमावस्या 

                                     सोमवार १७ जुलै २०२३ रोजी आषाढ अमावस्या म्हणजेच  दीप अमावस्या आहे. आषाढ अमावस्येनंतर येणाऱ्या पूजांच्या तयारीसाठी घरातील सर्व दीप स्वच्छ करून भक्तिभावाने पुजले जातात . अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा हा दीप मांगल्याचे प्रतीक आहे .दीपपूजन करून गोडाधोडाचे नैवेद्य दाखवतात , दीप आरती म्हणतात .सर्वदिप प्रज्वलित करून पूजा करतांना इतकं प्रसन्न आणि आनंदमय वातावरण होत.आणि एक उत्साहाची लहर शरीरात उत्पन्न होते .

या दिवशी मांसाहार करून पुढे अनंत चतुर्दशी पर्यंत मांसाहार करीत नाहीत .पण सध्या या बेधुंद आणि बेबंध राहणाऱ्या काही समाज कंटकांनी गटारात लोळण्याची वेळ येईपर्यन्त दारूच्या बाटल्या ढोसून so called " गटारी अमावस्या " म्हणून या दिवसाची निर्बत्सना केली . आणि दुर्दैव असे कि सोसिअल मीडियावर मुद्दाम मुद्दाम गटारी अमावस्या म्हणून उल्लेख केला जातो काही वाहिन्यांनी तर कहरच केला - चित्रपटाची जाहिरात करतांना " गटारी स्पेशल " म्हणून उल्लेख करतात . खरंतर दारू ढोसणाऱ्याला दिवस आणि मुहूर्ताची काही गरज नसते - आली लहर केला कहर अशी त्यांची अवस्था असते . पण जाणूनबुजून संस्कृती बद्दल गैरसमज वाढवणाऱ्या या वळवळत्या किड्यांनी कितीही प्रयत्न केला तरी ज्याचे जे वैशिष्ठ्य आहे ते अबाधित राहत हे पक्के ध्यानात ठेवाव

अनेक साईटवर दीप अमावास्येची माहिती दिलेली असते , आणि काही साईटवर शेवट अशी टीप लिहिलेली असते कि " येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. " बरोबरच आहे कारण शास्त्राला " अनुभूती " म्हणजे काय हे कळतच  नाही , शास्त्र तिथपर्यंत पोचूच शकत नाही मग  शास्त्र कसले पुरावे देणार !

                                                                                                                      ...... मालकंस 

  अधिक मास 

                                                                   पुरुषोत्तम मास 


                                             आपली हिंदू कालगणना , पृथ्वीची सूर्याभोवती फिरण्याची गती , पृथ्वीची स्वतः भोवती फिरण्याची गती आणि चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची गती या तीन  परिमाणांवर केली जाते म्हणजेच सौरवर्ष आणि चांद्र वर्ष . या तीन  गतींमध्ये दरवर्षी अकरा दिवसांचा फरक पडतो .आणि हा फरक भरून काढण्यासाठी बत्तीस  महिन्यांनी  अधिक मास घेतला जातो ज्या महिन्यात रवीची संक्रांत होत नाही .आणि हा काळ आषाढ आणि श्रावण या दोन महिन्यांमध्ये असल्यामुळे अधिक श्रावण येतो .

                                       अधिक महिन्यात , मुलगी आईची ओटी भरते तसेच जावयाला , ब्राह्मणाला , गाईला अधिक महिन्यात वाण देतात अधिक मास - या वर्षी - १८ जुलै २०२३ प्रतिपदा  ते १६ ऑगस्ट २०२३ अमावस्या .

                                      बाकी आपण श्रावण सोमवार  , इतर उपवास , व्रत वैकल्य पारायण वाचन हे श्रावण महिन्यातच करावे . श्रावण मास -  या वर्षी - १७ ऑगस्ट २०२३ प्रतिपदा  ते १५ सप्टेंबर २०२३ अमावस्या

         या वर्षी श्रावण सोमवार - २१ ऑगस्ट २०२३ /  २८ ऑगस्ट २०२३ /  ४ सप्टेंबर  २०२३ / ११ सप्टेंबर  २०२३

अधिक महिन्यात दशमी , एकादशी , द्वादशी पौर्णिमा या दिवशी दान देतात .अधिक महिन्यात गंगास्नान हि करावे . अनारसे ,बत्तासे पेढे यांची दान दिली जातात . 

                                अधिक  मासात विष्णू स्वरूप कृष्णाचे महत्व असल्यामुळे कृष्णाला अधिक मासात दररोज तुळशी वाहून लोण्याचा नैवेद्य दाखवतात 

                                                                                                  ..................................मालकंस 

                                                                                                                          विनता उद्योग समूह 

वैवाहिक जीवन - विनता सोसिअल - मराठी - भाग १ - Vaivahik Jivan - Part १

                                        वैवाहिक जीवन 

भाग १
                " आमच्या वेळी असं होत ,,आमच्या वेळी तसं होत ,,  आम्ही खरं आयुष्य जगलो " 
                       छे ,ऐकून ऐकून कंटाळा आला आहे , जुन्या  काळातलं सांगत राहतात 
                 अहो काळ किती बदलला आहे , आता जुन्या गोष्टी काही राहिलेल्या नाहीत .
               खूप बदललेल्या आहेत 
कोण  सांगणार यांना ?
गोष्टी बदलेल्या आहेत ? खरंच असं वाटत ?
साठ सत्तर वर्षांपूर्वी पुरुष जसा होता तसाच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी स्त्री जशी होती तशीच आजही आहे 
साठ सत्तर वर्षांपूर्वी दोचांमध्ये ज्या भावना होत्या त्या आजही आहेत 
संतती होण्यासाठी दोघांनी एकत्र येणं हे आजही गरजेचं आहे जे पूर्वीही होत
स्त्री पुरुष दोघांनाही एकमेकांचा सहवास , हवाहवासा आजही वाटतो .
या सर्व जीवन जगण्यासाठी ज्या मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत त्या आजही तश्याच आहेत 
मग बदललं काय ?
" विचार "
" तंत्रज्ञान "
तंत्रज्ञानाच्या प्रगती मुळे विचारांमध्ये आमूलाग्र बदल झाला !
विचार बदलले तसे आचारही बदलले .
विचार बदलले  तश्या अपेक्षा . राहणीमान , भावनांचा अग्रक्रम बदलला 
तंत्रज्ञानाचा पगडा विचारांवर इतका पडला कि 
काय करावं , काय करू नये , याचा सारासार विचार करण्याची क्षमता कमी झाली 
 प्रेम वात्सल्य ,त्याग ,आदर, विनम्रता , विश्वास  ,संयम आणि स्वार्थ .या भावना आजही मनात आहेत 
पण .......
भ्रामक सुखाच्या अति मागे लागल्यामुळे स्वार्थ या भावनेने बाकी भावनांना बांधून ठेवलं
चार भिंतीत एकत्र राहत असले तरी एकमेकांपासून फार दूर 
मी आणि माझं विश्व् या भोवतीच फिरत राहिलो .
सामाजिक विचारांच्या बदला मुळे
स्त्री घराबाहेर पडली , पूर्वी   कधी जे तिने विश्व् बघितलं नाही त्या विश्वात ती लीलया रमायला लागली.
स्त्रीच्या आचारतेत झालेला हा बदल खरंच व्यक्ती म्हणून निर्विवाद कौतुकास्पद आहे .
पण हे कौतुक काही अंशी पुरुषाला मानवल नाही . 
आणि 
जीवन होडीच्या मध्यावर हातात हात घालून उभी असलेली ती दोघं 
होडीच्या दोन टोकावर जाऊन राहिली .


  

Next

दीप अमावस्या - आषाढ अमावस्या

                                                                      ।। श्री ।।                                     आषाढ अमावस्या - दीप अमा...