मुंबई लोकल ट्रेन
#सर्व लोक एकाच वेळी इतकी चेंगराचेंगरी करून हीच गाडी मिळाली पाहिजे असा आग्रह का धरतात ? ,
प्रत्येक जण कुठेना कुठे पोटापाण्यासाठी नोकरी करणारा नोकरदार असतो. त्याला त्याच्या मर्जीप्रमाणे नोकरीला जाता येत नाही हि वस्तुस्थिती आहे ,
प्रत्येकाला वेळेची बंधने असतात , उशिरा नोकरीवर गेलं तर नोकरीवर गदा, मग काय करणार अगतिक होऊन चेंगराचेंगरीतून जाणे भाग पडते ,
सगळ्यांच्या ऑफिस च्या वेळा एकच मग बिचारे नोकरदार तरी काय करतील अश्या ह्या लोकांच्या अगतिकतेचा कोणत्याही शासनाने चुकून तरी विचार केला आहे का ?
#आता अशी परिस्थिती निर्माण होण्यासाठी जनताही तितकीच जबाबदार आहे
त्यांना शहरातील जीवन शैलीचे फार आकर्षण , म्हणजे असे कि मोठ्या शहरातील नोकरी सोडून इतर ठिकाणी नोकरी मिळण्याची संधी मिळाली तरी ती नाकारतात , मुंबईसारख्या मोट्या शहरात इतक्या त्रासदायक अडचणी असूनही मुंबईतच स्थायिक व्हायचे असा अट्टाहास का ?
# मग ह्या लोकलच्या गर्दीवर प्रशासन जो काही मार्ग काढेल तो जनतेला मान्य करावा लागेल
#अनेक वेळा असेही होते कि कॊटुंबिक आर्थिक स्थिती चांगली नसल्या मुळे अनेक तरुणांना मर्जी विरुद्ध मोठ्या शहरात नोकरी करणे भाग पडते
अश्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमुळे हि परिस्थिती निर्माण झाली आहे , हि परिस्थिती काही एकदोन वर्षात झालेली नाही. माझ्या माहिती प्रमाणे गेली तीस चाळीस वर्ष हाच रगडा चालू आहे .
# याचे एका वाक्यात उत्तर मिळणारे नाही , आणि एखादी कृती करूनही हा प्रश्न सुटणार नाही
# ज्यांना मुंबई सोडून अन्य ठिकाणी स्थायिक होणं शक्य असेल तर त्यांनी त्वरित विचार करावा .
# तसेच ज्या कंपन्यांना आपल्या कर्मचाऱ्यांना मुंबई किंवा मोठ्या शहराच्या बाहेर असणाऱ्या शाखांमध्ये रुजू करता आलं तर पाहावे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Next

फॉरवर्ड करण्याची संस्कृती

  आठवतात ते दिवस आजची forward करण्याची संस्कृती ....... मी मध्ये एका संगीत गाण्याच्या ( live instruments ) स्पर्धेला गेलो होतो . अर्थातच म...